Maharashtra Mansoon Update
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २२ जिल्ह्यांना आज यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस हवामान खूपच ढगाळ राहण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणात पानी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई महापालिकेने (BMC) पावसामुळे संभाव्य पूर परिस्थिती, जलतरणीचा धोका, झाडे कोसळणे, वीज पडणे यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पुढील ४८ तासांमध्ये विदर्भात वादळंसह पानी
हवामान विभागाने पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. विशेषतः दुपारनंतर व संध्याकाळी मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी देखील अलर्ट
शेतकरी मित्रांनो मान्सूनचा जोर वाढल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाली असली तरी, अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कृषी विभागानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नांगरणी, बियाणे पेरणी यासाठी योग्य वेळेची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अलर्ट असलेले प्रमुख जिल्हे पाहा
ऑरेंज अलर्ट (अतिवृष्टीचा धोका): मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर
यलो अलर्ट (मध्यम ते जोरदार पाऊस): पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, लातूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आज पावसाला सुरुवात होईल
राज्यभरात मान्सूनचा जोर पाहता प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडावे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर काळजीपूर्वक करावा आणि प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये.
0 टिप्पण्या