Durgaprasad Gharatkar
Maharashtra Rain Update : नमस्कार मंडळी मान्सून अजूनही पुढे सरकला नाही पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसात मान्सून विदर्भासहित इतर भागात प्रवेश करेल तसच राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता
आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल आहे.
राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे .
तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात
आला आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. रविवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा
कमी होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसच काही भागात जोरदार पाऊसही पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भातील आणखी काही भागात दाखल होईल. तसच छत्तीसगड आणि ओडिसाच्याही काही भागात मानसून प्रगती
करेल. तर गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार मधील काही भागात मानसून पुढील तीन दिवसांमध्ये दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे .
0 टिप्पण्या