Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar
Rain update Maharashtra: नमस्कार मंडळी कसे आहात मे महिन्यामध्ये उन्हाळा हा अगदी गरम असणं अपेक्षित असताना याच्या अगदी विपरीत संपूर्ण राज्यामध्ये सकाळी ऊन पडते, दुपारी प्रचंड गरम होतेय आणि त्याच्यानंतर मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय. शहरी भागांमध्ये नाले आणि चेंबर तुंबताना दिसताय, तर ग्रामीण भागांमध्ये असाच पाऊस सुरू राहिला तर नांगरणी कशी करायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तर ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळताना दिसतोय आणि या सर्व परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागाला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पाऊस इतका पडतोय की अगदी 5 मिलिमीटरपासून ते 56-58 मिलिमीटर पर्यंत पावसाची भर उन्हाळ्यामध्ये नोंद होताना दिसते. मुंबईमध्ये तर अगदी 80-85 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. अचानक इतका पाऊस का पडतोय, किती दिवस हे सुरू राहील, या दरम्यान काय काळजी घ्यायला हवी, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात.
मे महिन्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत 85 mm पावसाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. संपूर्ण कोकण रिजन, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे. आता ज्यावेळेस ऑरेंज अलर्ट असतो, त्यावेळेस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते. या काळामध्ये सर्वांनी काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं आणि गरज नसताना घराबाहेर पडणं अपेक्षित नसतं.
मे मध्ये अवकाळी पाऊस पडणार हे अगदी साहजिकच आहे, पण अवकाळी पाऊस पडतो कधी, तर मेच्या शेवटी-शेवटी पडत असतो. ज्यावेळेस उन्हाळा हा अगदी पीकवरती पोहोचलेला असतो, असह्य उकाडा ज्यावेळेस झालेला असतो, त्यावेळेस त्या असह्य उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून अवकाळी पाऊस पडत असतो. अवकाळी पाऊस पडतो कोणत्या वेळेस, तर अगदी चहा पिण्याच्या अगोदरचा जो वेळ आहे, त्या दरम्यान तीन नंतर चार-पाच दरम्यान हा पाऊस पडत असतो. एखाद-दोन तास जोरदार मुसळधार पाऊस पडत असतो, पण यावेळेस मात्र थोडंसं वेगळं चित्र दिसतय. मेच्या सुरुवातीपासूनच पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपायला सुरुवात केलेली आहे. पाऊस सुरू झाला की पाच-पाच, सहा-सात तास पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय. याच्यामुळे 2021 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शहरांमध्ये मे मध्ये कमी तापमान जाणवतय. मुंबईमध्ये तर या दिवसांमध्ये भयंकर उष्णता असते, भयंकर घाम निघत असतो, आर्द्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असते, पण 1951 नंतर पहिल्यांदाच मे मध्ये इथलं तापमान हे 22 डिग्रीच्या आसपास नोंदवलं गेलेल आहे.
मुंबई आणि कोकण विभागाचा विचार करता, 6 ते 11 मे दरम्यान इथे चांगला पाऊस झाला. नंतर अधूनमधून थोडाफार पाऊस झाला, पण महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मात्र जोरदार ते अतिवृष्टी इतका पाऊस झालेला आहे. आता इतका पाऊस होण्यामागची कारणं काय आहेत, ती आपण समजून घेऊयात. पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल स्ट्रॉम असतात, जे भूमध्य समुद्र, जो आहे ज्याला मेडिटेरियन सी आपण म्हणतो, त्या ठिकाणी निर्माण होतात. 2025 या वर्षाचा विचार करता, हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस यांची तीव्रता आणि क्षमता वाढलेली दिसतेय. ज्याच्यामुळे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्रता आहे आणि हे वारे भारताच्या उत्तर आणि मध्य भागापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रापर्यंत पोहोचताना दिसून येतय आणि याच कारणामुळे मॉन्सूनच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय.
वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमध्ये ढग आणि पाऊस जे आहे, हे इरान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ओलांडून भारतापर्यंत येत असतात. त्याच्यामुळे पडणाऱ्या पावसामध्ये थंड हवा आपल्याला जाणवते, जोरदार पाऊस सुद्धा पडतो. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमध्ये वारे ज्यावेळेस वाहत असतात, त्यावेळेस ते थंड असतात, त्याच्यामध्ये मॉइश्चर सुद्धा असतं. पण ज्यावेळेस हे वारे भारतातील उत्तर भागामध्ये येऊन धडकतात, तेव्हा थंड हवा तुलनेने उष्ण हवेला वर ढकलते आणि ज्यावेळेस उष्ण हवा ही एका ठराविक लेव्हलच्या वर जाते, त्यावेळेस ती वेगाने थंड होते आणि त्याच्यामुळे मुसळधार पाऊस पडत असतो.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अरबी समुद्राचं. महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र यावर्षी नेहमीपेक्षा जास्त उष्ण आहे. पाणी जरा नेहमीपेक्षा जास्त उष्ण दिसते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाफ सुद्धा तयार होते, ज्याला आपण बाष्प म्हणतो. ती बाष्प तयार होते, ती हवेमध्ये मिसळते. आता ही बाष्पयुक्त हवा समुद्रावरील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राकडे ढकलली जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा पाऊस पडतो. जे आपण नॉर्मल पावसाचं सायकल सांगत असतो की समुद्र जे आहे, समुद्राच्या इथे पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग बाष्पीभवन झालेलं जे आहे, त्याच्यापासून ढग तयार होतात आणि नंतर पाऊस पडतो. हे जे सायकल आहे, हे सायकल या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अल निनो आणि ला निना. अल निनो म्हणजे भारतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते. समुद्र जो आहे, हा तुलनेने अधिक गरम असतो, त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आपल्याला दिसून येते, दुष्काळ पडतो असं सुद्धा सांगितलं जातं. अल निनो ज्यावेळेस असतो, त्यावेळेस आणि ला निना ज्यावेळेस असते, त्यावेळेस जास्त उष्णता जाणवत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो. 2022, 23, 24 या कार्यकाळामध्ये संपूर्ण जगामध्ये अल निनो हा ऍक्टिव्ह होता, पण गेल्या काही महिन्यांपासून ला निना ऍक्टिव्ह झालेला आहे, असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसून येतो.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी म्हणलं तसं अल निनो असतो, त्यावेळेस दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते. पण ज्यावेळेस ला निना ऍक्टिव्ह असतं, त्यावेळेस जास्त पाऊस पडत असतो किंवा समाधानकारक पाऊस पडत असतो आणि यावेळेस ला निना ऍक्टिव्ह आहे. याच विषयाला धरून अजून आपण जर का पुढे जाऊन सांगायचं म्हटलं, अल निनोमध्ये पडला तर जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असते, कमी काळावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, नाही तर अजिबातच पाऊस पडत नाही, सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडतो. पण याच्या अगदी विरोधात ला निना ज्यावेळेस ऍक्टिव्ह असतं, त्यावेळेस आपल्याला जो पाऊस सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पडणं अपेक्षित असतं, तोच पाऊस नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पडताना सुद्धा दिसून येतो.
याच विषयाला हवामान बदलाचा सुद्धा एक अंगल आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, बेसुमार वृक्षतोड होताना दिसते आणि याच्यामुळे पृथ्वीवरील सरासरी तापमान वाढत चाललेला आहे. याचा परिणाम असा होऊन जातोय की हवामानाचा अंदाज लावणं, वेदर प्रेडिक्ट करणं हे कठीण होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळेच अचानक पाऊस पडतोय, कधी ढगफुटी होतीय, कधी गारा पडतायत. उन्हाळा जो आहे, तो कधी-कधी लांबलेला दिसतोय, तर कधी-कधी अगदी डिसेंबरपर्यंत सुद्धा पाऊस पडताना दिसून येते. हवामान बदल हेच कारण आहे, ज्याच्यामुळे मे महिना हा अगदी शुष्क आणि अति उष्णतेचा असणं अपेक्षित असताना सुद्धा आपल्या इथं पाऊस पडतोय, ते सुद्धा रेगुलरली.
जूनच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मॉन्सून हा केरळ किनारपट्टीवरती येत असतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरती येऊन धडकत असतो. यावर्षी मॉन्सूनचे वारे वेळेपेक्षा आधीच अंदमान-निकोबार बेटामध्ये पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्री-मॉन्सून शावर किंवा अवकाळी पाऊस जो आहे, हा मोठ्या प्रमाणात पडताना दिसून येते. शहरी भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचं कारण आहे, एक तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉंक्रिटीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे हिट ट्रॅप झालेली असते, ज्याच्यामुळे हवेमध्ये एक हॉट बबल सुद्धा तयार झालेला असतो आणि ज्याच्यामुळे हा मुसळधार पाऊस पडतो. यालाच अर्बन हिट आयलँड इफेक्ट सुद्धा म्हणता येईल. जिथं शहरीकरण जास्त झालेलं आहे, तिथं तुम्हाला लक्षात येईल की गेल्या काही वर्षांपासून मुसळधार पाऊस अगदी कमी वेळामध्ये पडतोय, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी तर मोठ्या प्रमाणात होते, रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलेलं दिसून येते आणि या पाण्याचा निचरा सुद्धा होत नाही, कारण की कॉंक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
आता येणारे तीन-चार दिवस ही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आता तुमच्या भागामध्ये येलो अलर्ट आहे की ऑरेंज अलर्ट आहे, हे तुम्ही चेक करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आयएमडीच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. त्याच्यामध्ये सॅटेलाईट या बटनवरती तुम्ही क्लिक केलं की मग तुम्हाला सध्या काय परिस्थिती आहे, हे एक्स-रे टाईप एक इमेज दिसते. तिथंच डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला अलर्ट्स लिहिलेलं असतं. तिथे सबडिव्हिजनवरती जर का तुम्ही क्लिक केलं, तर परत एकदा भारताचा नकाशा जो आहे, तो ओपन होतो. मग तिथं कुठं ग्रीन कलर तुम्हाला दिसेल, कुठे येलो कलर दिसेल, कुठे ऑरेंज कलर दिसेल. यासोबतच वेगवेगळे साईन सुद्धा त्या ठिकाणी दिलेले असतील, ते तुम्ही तिथं चेक करू शकता. याच्याशिवाय इतर कोणत्याही सोर्सेसवरती कृपया विश्वास ठेवू नका. अगदी दोन-तीन दिवसांपूर्वी चक्रीवादळ शक्ती येणार म्हणून बातम्या येताना दिसत होत्या, पण अशा पद्धतीचं कोणतंही चक्रीवादळ येणार नाहीये, असं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे. आणि हवामान विभागाने त्याच्यामुळे हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की, हवामान विभागाकडून जे अलर्ट दिले जातात, त्याच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवावा, इतर कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नये.
आता या काळामध्ये, जेव्हा जोरदार पाऊस पडतोय, त्या काळामध्ये घरामध्ये थांबणं योग्य आहे. लोकल वेदर अपडेट्स आणि अलर्ट जे आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. नदी, नाले तसेच तलाव यांच्यापासून दूर राहणं सुद्धा अपेक्षित आहे. ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडत असतो, विजांचा कडकडाट होत असतो, त्यावेळेस शक्य असेल तर झाडाखाली कृपया थांबू नका, योग्य ठिकाणी आसरा घ्या. आणि जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर ओढा भरून पाणी वाहत असताना, त्याच्यामध्ये कृपया गाडी घालून लवकर घरी पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये जीव धोक्यात घालू नका. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःचं तसेच जनावरांचं विजेपासून रक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे.
आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
0 टिप्पण्या