विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट; मुसळधार सरींची शक्यता | Monsoon 2025.


Digital Gaavkari News

मुंबई, दि. ८ जून २०२५: मान्सूनचा प्रवास गेल्या दहा दिवसांपासून थांबलेला आहे. पोषक हवामान नसल्याने मान्सून एकाच भागात स्थिर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. आजही मान्सून मुंबई, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात आहे. मान्सूनची सीमा मुंबई, अहमदनगर, आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाटपर्यंत आहे.

हवामान विभागानुसार, २८ मेपर्यंत मान्सूनने राज्याच्या अनेक भागांत प्रगती केली होती; मात्र, त्यानंतर प्रतिकूल हवामानामुळे त्याची वाटचाल थांबली. पुढील पाच दिवसांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आज आणि उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागांत पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या अंदाजानुसार पिकांचे नियोजन आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या