कागदी, प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरू नका व राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका
डिजिटल गावकरी न्यूज
गोंदिया : राष्ट्रीय सण व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यांवर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
शासनाच्या १ जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्यासाठी उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्या संबंधित विभागाने कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावेत. तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
शासनाच्या १ जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्यासाठी उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्या संबंधित विभागाने कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावेत. तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या