पावसाळी पेरणी 2025: महाराष्ट्रात कोणती पिके घ्यावीत?


Digital Gaavkari
Durgaprasad Gharatkar

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
2025 सालचा पावसाळा वेळेवर सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जून- जुलैमध्ये पेरणीसाठी योग्य संधी मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने योग्य पिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाची आहे. या लेखात आपण 2025 मध्ये कोणती पिके घ्यावीत हे जानुन घेऊ

१. भात (धान)

प्रदेश: कोकण, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा

जात: आलम, रत्नागिरी-24, मसूरी

फायदे: भरपूर पाऊस असलेल्या भागात भरघोस उत्पादन, चांगली बाजारपेठ

टीप: पाण्याचा निचरा आवश्यक, कीड नियंत्रण महत्त्वाचे

२. नाचणी (रागी)

प्रदेश: कोकण, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र

जात: कोकण नाचणी, फुले नाचणी

फायदे: कमी पाण्यावर येणारे, पौष्टिक पीक

टीप: जमिनीत नायट्रोजनयुक्त खते वापरावीत

३. ज्वारी

प्रदेश: मराठवाडा, खानदेश

जात: मालदांडी, फुले पंचमी

फायदे: कमी पाण्यावर टिकणारे, चारा आणि अन्न दोन्हीसाठी उपयुक्त

टीप: जैविक कीटकनाशक वापरावे

४. बाजरी

प्रदेश: खानदेश, विदर्भ

जात: आयसीटीपी-8203, धुळे-1

फायदे: दुष्काळी भागासाठी योग्य, पशुखाद्य व अन्न म्हणून वापर

टीप: वेळेवर पेरणी करावी

५. मूग आणि उडीद

प्रदेश: संपूर्ण महाराष्ट्र

जात: बीएम-2003-2 (मूग), टीएयू-1 (उडीद)

फायदे: लवकर येणारी कडधान्ये, जमिनीत नत्र वाढवतात

टीप: बियाण्यावर रायझोबियम प्रक्रिया करावी

६. मका

प्रदेश: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ

जात: डेक्कन-103, जीएच-0727

फायदे: अन्न, चारा, औद्योगिक वापरासाठी उपयुक्त

टीप: नायट्रोजनयुक्त खत वापरावा

७. भुईमूग

प्रदेश: सातारा, कोल्हापूर, विदर्भ

जात: टीएजी-24, जेएल-24

फायदे: तेलबिया पीक, चांगला नफा

टीप: चांगला निचरा असलेली जमीन असावी

पेरणीसाठी काही महत्त्वाच्या टिपा

जमीन तयारी: सेंद्रिय खतांचा वापर करून नांगरणी करा

बियाण्यांची निवड: शास्त्रशुद्ध आणि रोगमुक्त बियाणे वापरा

पाणी व्यवस्थापन: पावसाचे योग्य नियोजन करा
खत व्यवस्थापन: संतुलित खतांचा वापर करा

कीड नियंत्रण: जैविक उपाय वापरणे फायदेशीर

2025 चा हवामान अंदाज

कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र: चांगला पाऊस

मराठवाडा, खानदेश: मध्यम पाऊस

मे महिन्यात प्री-मान्सून पाऊस: काही भागात आधीच जमिनीला ओल

शासकीय योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना: पीक नुकसान भरपाईसाठी

जलसंधारण योजना: पाणी साठवणीसाठी

मनरेगा: शेतकामासाठी मजूर उपलब्ध होतात

2025 मध्ये पावसाळी हंगामात योग्य पीक निवड ही यशस्वी शेतीसाठी अत्यावश्यक आहे. हवामानाचा अंदाज, जमिनीचा प्रकार आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका आणि भु

ईमूग यापैकी पिकांची निवड करा. योग्य नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास नक्कीच भरघोस उत्पन्न मिळवता येईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या